खासदार आहे पण पक्ष संघटना मात्र गायब

Foto
 औरंगाबाद  :- 2014 मध्ये औरंगाबाद शहराच्या राजकारणात प्रवेश करणार्‍या एमआयएम पक्षाने 2015 च्या  मनपा निवडणुकीत जोरदार एन्ट्री  केली होती. पक्षाने 52 उमेदवार उभे केले असता 25 नगरसेवक निवडून आले. आज जिल्ह्यात पक्षाचा खासदारही आहे. मात्र पक्षाला संघटनात्मक ओळख नाही. कुठलीही कार्यकारिणी नाही आणि कुणी पदाधिकारी नाही कारण सहावर्षानंतरही  जिल्हा व  शहर अध्यक्षाची नियुक्‍ती करण्यात आलेली नाही. पक्षाचे  राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन  ओवेसी यांच्यामुळे पक्षाला हे यश मिळाले. त्यांनीच विस्तार केला. 2014 मध्ये असदुद्दीन ओवेसी यांचे धाकट भाऊ आमदार अकबरूद्दीन ओवेसी आपल्या वादग्रस्त भाषणाने चांगलेच  गाजले. आपल्या तुफानी भाषणाने ते अल्पसंख्यांक  युवकांच्या गळ्याचे ताईत बनले आणि त्याचा परिणाम  लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसला

 औरंगाबादमध्यमधून इम्तियाझ जलील आमदार झाले. सहामहिन्यात मनपा निवडणुका झाल्या आणि त्यातही अल्पसंख्याक व दलित समाजाने पक्षाला अक्षरश  डोक्यावर घेतले. 25 नगरसेवक निवडून आले. 2019 च्या लोकसभा  निवडणुकीत वंचित बहुजनशी आघाडी करून या आमदार जलील खासदार झाले. मात्र नंतरच्या विधानसभा निवडणुकीत वंचितबरोबर जमले नाही.  त्यामुळे शहरातील  तिन्ही उमेदवारांना पराभव झाला. मात्र तरीही मतदान चांगले मिळाले. दरम्यान एप्रिलमध्ये होणार्‍या  पालिका निवडणुकीसाठी पक्ष जोमाने उभे राहील असे वाटत होते  मात्र इतर पक्ष तगड्या उमेदवारांच्या शोध प्रक्रियेत असतांना एमआयएम पक्षाची अजूनही तयारी झाल्याचे दिसून येत नाही. खासदार इम्तियाज दिल्लीत असून कार्याध्यक्ष डॉक्टर गफ्फार काद्री यांची चाचपणीच सुरू आहे. एमआयएमचे  मुस्लिम बहुल भागात आज ही वजन आहे मात्र स्थानिक  नेते वेट एन्ड वॉचच्या भूमिकेत तर इच्छुकांत चलबिचल दिसत आहे.